Friday, 22 January 2016

मुक्तो मोन डॉट कॉम

                    मुक्तो मोन डॉट कॉम

'अविजित रॉय ' या बांगला देशीच्या एका लेखकावर त्याच्या पत्नीवर झालेल्या हल्याने मी मनाच्या अस्वस्थ अवस्थेत गेलो. या हल्यामध्ये अविजित रॉय यांचा मृत्यू झाला. रॉय यांच्या पत्नी सुदैवाने बचावल्यापानसरे पती पत्नीच्या वर झालेल्या हल्याशी साम्य असलेली ही घटना! बांगला देशासारख्या मागास इस्लामी मुलतत्व वाद्यांचे आगार असलेल्या देशात अशा घटना अपेक्षितच असतात.
  

     
  बांगला देशात ढाका विद्यापीठात शिकवणाऱ्या प्राध्यापक 'अजोय रॉय ' यांचा अविजित रॉय हा मुलगा ! अविजित रॉय अमेरिकेत राहत असत.  पण बांगला देशातील फोफावणाऱ्या धर्मवाद्यांच्या कारवायांना जमेल तितका ते प्रयत्न करीत.  त्यांच्या मुक्तो मोन .कॉम या ब्लॉग वर ते लिखाण करून ते व्यक्त होत असतत्यांची अनेक पुस्तकेही प्रसिद्ध झालेली आहेत.  पैकी 'बिश्वाशेर व्हायरस ' हे पुस्तक सर्वाधिक गाजलं  आणि खपलं ही ! अंधश्रधेच्या  विरोधात ते लिहीत असत.  त्याही पुढे जाऊन  'श्रद्धा हे अंधश्रद्धेचेच दुसरे नाव आहे ' अशी ही भूमिका ते मांडत ! त्यांचे म्हणणेत्यांची मते ते अतिशय प्रभावीपणे  तर्कशुद्ध पद्धतीने लिहीत . 'मन मुक्त असावं आणि त्यावर धर्म वगैरे चा पगडा नसावा ' अशा विचारांसाठी त्यांचा ब्लॉग चर्चेसाठी आणि ‘ हो’  टीकेसाठी ही नेहमीच खुला होता .
           आपल्या दाभोळकर , पानसरे किंवा बांगला देशातील रॉय यांच्या सारख्या विवेकाने व्यक्त होणाऱ्या निरुपद्रवी व्यक्तींना जीवे मारून नेमके काय मिळत असावे या मारेकऱ्यांना ? मारून विचार नष्ट होतात ? खरे तर श्रद्धा - अंधश्रद्धा , धर्म - अधर्म  या बद्दल प्रत्येक व्यक्तीच्या मनात विचार येतच  असतात . आपल्यासारखी सामान्य माणसे ' कोण काय म्हणेल ?' या भीतीने विचार करीत नसतात . दाभोळकर ,  पानसरेअविजित रॉय यांच्यासारख्या असामान्य व्यक्ती  त्यांचे स्वतःचे विचार व्यक्त करण्याचे धाडस करतात. व्यक्त होणे महत्वाचे ! आम्ही सामान्यांनी व्यक्त होणेच सोडले आहे . मळलेल्या त्याच त्याच वाटेने चालत राहून , व्यक्त होता आयुष्य जगायचे आणि धन्यता धन्यता ही मानायची !
      वास्तविक धर्माची संकल्पना मानवाच्या कल्याणासाठी आखली गेली . विश्वाच्या निरनिराळ्या धर्मसंस्थापकांनी , निरनिराळे धर्म स्थापन केले . प्रत्येक धर्माची शिकवण थोड्या फार फरकाने सारखीच आहे . चांगल्या वर्तणुकीने आपल्याबरोबर सर्वांचेच कल्याण व्हावे असेच सर्व धर्मात सांगितले गेले आहे . कालांतराने ह्या सर्व चांगल्या असलेल्या धर्मात वाईट प्रवृत्ती शिरल्या , राजकारणाने हि त्याचा ताबा घेतलासमाजातील व्यक्त होणाऱ्या मोठ्या वर्गामुळे वाईट प्रवृत्तीना बळ आले .
  'माझा धर्म तो चांगला , इतर धर्म वाईट ' अशा विचारांचा फैलाव राजकारण्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी सामान्य माणसात रुजवला . सामान्य माणूस देखील याला सहज बळी पडला . पुढे  'आपल्या धर्मापेक्षा इतर धर्म वरचढ  होतील की  कायह्या भयगंडाने प्रत्येक धर्मिय पछाडला  गेला . त्यामुळे स्वतःच्या धर्मातही काही वाईट गोष्टी  आहेत याचा मानवाला विसर पडू लागला. मग अशा वाईट गोष्टींची वाच्यता कोणीही मग स्वधर्मियांनी किंवा कुणीही केली तर त्यांचा राग येऊ लागला . आणि आता अशा वाईट वृत्ती किंवा तथाकथित धर्माचे ठेकेदार पूर्णपणे हिंसक बनू पहात आहेत , हे फार अस्वस्थ करणारे आहे .
             खरे तर दाभोळकर , पानसरे काय किंवा अविजित रॉय काय , ही मंडळी तशी निरुपद्रवीचविवेकाने आणि तर्कशुद्ध पद्धतीने आपली वेगळी मते मांडणारी ही मंडळी ! कोणताही आवेश आणता , प्रसिद्धीची अपेक्षा ठेवता , निरपेक्ष पद्धतीने सोप्या सामान्य माणसांना समजेल अशा भाषेत आपले मत ठामपणे मांडताना ह्या असामान्य व्यक्तींनी हौतात्म्य पत्करले . बर ही मंडळी काय सांगत होती ? प्रत्येक धर्मातील वाईट चालीरीती बंद करा . धर्मातील वाईट गोष्टी आंधळेपणाने स्वीकारू नका. ह्यात चुकीचे ते काय ? पण धर्ममार्तडांना  हे विचार कसे पटावेत ? तर्कशुद्ध प्रश्नांना या धर्मवेड्या मंडळींच्या कडे उत्तरे नसल्यामुळे त्यांनी या समाजसुधारकांना गोळ्या घालून संपवले . या धर्मवेड्या अतिरेक्यांना विचारांशी लढण्याची अजिबात कुवत हिम्मत नसते ,त्यामुळेच ते हा मार्ग स्वीकारतात .
    पण अशा बंदुकीच्या गोळ्यांनी विचार संपतात का ? ते संपत तर नाहीतच पण अधिक बळकट होतात . दाभोलकरांच्या हत्येनंतर 'अनिस ' ची चळवळ अधिकच बळकट झाली . पानसरेंच्या पुस्तकाच्या पूर्वी लाख प्रती खपल्या होत्या , आता त्यांच्या हत्येनंतर २० लाखावर खपल्या . गांधींची हत्या होऊन त्यांचे विचार कुठे संपले ? मनात सारखे विचार येत राहिले ……. खरच श्रद्धा -अंधश्रद्धा , धर्म-अधर्म , जात-पात विरहित मुक्त मनाने जगणारा समाज निर्माण होऊ शकेल  ? मानवाला मुक्त मनाने व्यक्त होता येईल ? होय ………नक्कीच ! पण  त्यासाठी आवश्यकता आहे ती दाभोळकर , पानसरेअविजित रॉय  यांच्यासारखे निर्भयपणे , मुक्त  मनाने  व्यक्त होण्याची …….  



राजीव जतकर
मोबाईल : ९८२२० ३३९७४.
इमेल : electroline4929@gmail.com



Tuesday, 19 January 2016

"आमच्या घरातून नं… चक्क पर्वती दिसते"

"आमच्या घरातून नं चक्क पर्वती दिसते"
अर्थात  'आम्ही पुणेकर'


"आमच्या घरातून नं चक्क पर्वती दिसतेकिंवा "आमच्या गच्चीतून ना सिंहगड दिसतो" हि पक्क्या पुणेकरांची आवडीची वाक्ये ! अधून मधून असे कुणालातरी सांगितल्या शिवाय खरा पुणेकर जगूच शकत नाही. आज सकाळी वेताळ टेकडीवरून पर्वती कडे पाहताना मला एका गंमतशीर प्रसंगाची आठवण झाली. ऐंशी च्या दशकात आम्ही निगडी प्राधिकरणात एक बंगला बांधून तिथे राहायला गेलो होतो. सेक्टर २१ मध्ये असलेल्या आमच्या बंगल्याच्या आजूबाजूला कुठलीच बांधकामे झालेली नव्हती. फक्त बाजूला बजाज ऑटो चा कारखाना दिसत असे. त्यामुळे बंगल्याच्या गच्ची वरून दूरपर्यंतचा भाग दिसत असेआमच्या शरद ने (माझा थोरला भाऊ) एक मोठी दुर्बीण आणली होती. त्यातून दूरवरची दृश्ये बघण्याचा आम्हाला छंदच लागला होता. एके दिवशी आम्हाला साक्षात्कार झाला, आमच्या निगडीतील बंगल्याच्या गच्ची वरून आम्हाला चक्क पर्वती दिसली. ( म्हणजे खरे तर आम्हाला तसा भास झाला.) आणि पुण्यापासून तब्बल वीस किलोमीटर दूर असलेले आमचे घर जाण्य पुण्यातच असल्याचे प्रचंड समाधान आम्हा सर्वांच्या चेहेऱ्यावरून बदाबदा ओसंडून वाहू लागले.



आम्हा पुणेकरांचा हा स्वभावविशेष इतरही काही बाबतीत आम्ही पुणेकरांनी प्रयत्नपूर्वक जोपासला आहे. आता हेच बघा ना…

 कांताबेनच्या  दुकानातली बाकरवडी चितळ्यांच्या बाकरवडी एव्हडी चांगली असली तरी आम्ही चितळ्यांच्या बाकरवडी साठी जीव टाकतो. 'बाकरवडी संपली' किंवा 'बाकरवडी एक वाजेपर्यंतच मिळेल' अशी उद्धट भाषा आम्ही पुणेकर आनंदाने सहन करतो. एकदा आमच्या वहिनींच्या हातावर कांताबेन ची बाकरवडी ठेवत मी म्हणालो "तासभर रांगेत उभे राहून आणली बाकरवडी चितळ्याच्या कडून !" वडी खाता खाता अतीव समाधानाने वाहिनी उत्तरल्या  " चितळ्यांच्या बाकरवडीची सर इतर कोणालाच नाही."

या आणि अश्या अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे आम्हा पुणेकरांचे आगळेपण तुम्हाला दिसेल.

 पेढे हि चितळ्यांचेच किंवा फार फार तर घोडके यांचे     

आम्ही पुणेकर वर्तमानपत्र फक्त 'सकाळ' घेतो. सकाळचा चहा आणि सकाळ नसेल तर आमचे काही बाबतीत फार वांधे होतात हो ! आताश्या पुण्यात इतरही काही वर्तमानपत्रे आपला जम बसवू पाहत आहेत. पण सकाळ तो सकाळ ! परवा आमचा बंड्या प्रातर्विधी साठी 'सकाळच' हवा असा हट्ट धरून बसला होता. (भावी पुणेकरच तो) आता बोला

·         चितळ्यांच्या प्रमाणे आम्हा पुणेकरांचे आणखीन एक दैवत म्हणजे पु. ना. गाडगीळ हे सोने दागिने विकणारी मंडळी. पु.ना. गाडगीळ हेच फक्त सोने विकतात बाकीचे सर्व सराफ सोन्याचा वर्ख लावलेले लोखंड किंवा तत्सम धातू विकतात असे आम्हा पुणेकरांचे ठाम मत आहेपु.ना. गाडगीळ दुकानाच्या बाहेर एक दीड किलोमीटर रांगेत उन्हातान्हाचे किंवा रात्री उशिरा पर्यंत उभे राहून अर्धा ग्रॅम सोने,  तेही अक्षयतृतीयेच्याच मुहूर्तावर घेणे यातील पराकोटीचा आनंद समाधान पुण्याबाहेरील लोकाना ( आम्ही अशांना सरसकट परप्रांतीय म्हणतो ) कसे समजणार? त्यासाठी असावे लागते पक्के पुणेकरच !

·         पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपती पेक्षाही आम्हा पुणेकरांचे श्रद्धास्थान म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ! इतर कोणत्याही देवाधीकांचे दर्शन घेण्यात फारसा वेळ दवडता आम्ही दगडूशेठ गणपती चे दर्शन घेऊन हमखास मिळणारे पुण्य मिळवतो. इतर शहरात किंवा राज्यात स्थाईक झालेले काही पुणेकर आवर्जून पुण्यात येतात एकवीस नारळाचे तोरण मंदिरात बांधून किलो किलो ने पुण्य मिळवतात. आणि हो गणपतीचे दर्शन अरुंद रस्त्यावर तासंतास रांगा लाऊन, रहदारीला अडथळा आणून एक वेगळेच जास्तीचे पुण्या आम्हा पुणेकरांना मिळते ते म्हणजे बोनसच !

आम्हा पुणेकरांच्या अश्या अनेक गोष्टी सांगायला गेलो तर एक प्रबंधच लिहावा लागेल. " बेडेकर किंवा वैद्यांची मिसळ, सुजाता मस्तानी, डेक्कन वरची आप्पा ची खिचडी,  वैशाली, रुपाली वरचा गप्पांचा अड्डा, वाडेश्वर ची इडली अशी आमची अनेक वैशिष्ट्यपूर्ण श्रद्धा स्थाने आहेत. प्रत्येक ठिकाणावर स्वतंत्र लेख लिहिता येइल. पण आत्ता वेळ नाही, तुम्हाला सुचली तर जरूर कळवा. आत्ता मात्र मला पळावे  लागणार आहे मंडई जवळच्या 'महाराष्ट्र टी डेपो' मध्ये ! हा चहा घेतल्या शिवाय आम्हा पुणेकरांच्या सकाळी पोटात कळ येत नाही. जाम वांधे होतात राव !   


राजीव जतकर
मोबाईल : ९८२२० ३३९७४.
इमेल : electroline4929@gmail.com