Friday, 10 July 2020

माझे ओसाड गावाचे राज्य _ Part 2



          कधी कधीआपला लेख आवडलाअसे आवर्जून सांगणारे फोन येत तेव्हा मात्र फार बरे वाटे. एकदा कोपरगाव हुन एका इकॅम सभासदाचाविक्रमादित्याचालेख आवडला, असे सांगणारा फोन आला. ते सभासद म्हणाले. तुम्ही अगदी आमच्या मनातलेच लिहिता. तुमच्यासारखे आम्हाला लिहिता येत नाही. मी तुमचा लेख मोठी झेरॉक्स करून महावितरणच्या कार्यालयाच्या दरवाज्यावर लावला आहे. काल तो लेखाचा कागद महावितरणच्या कोणीतरी फाडून टाकला. मी आज सकाळी परत चिटकवून आलो." मला ह्या प्रतिक्रियेची मोठी गंमत वाटली. त्याही पेक्षा समाधान वाटले. कदाचित विद्युत ठेकेदारांच्या अडचणींना, प्रश्नांना मी माझ्या लिहण्यातून वाचा फोडत होतो. पण अशा प्रतिक्रिया फारच क्वचित येत असत, बाकी सारे ओसाडगाव !

   इकॅम वार्ता करीत असतानाच इकॅम ची इतरही कामे जोरात चालू होती. कारण इकॅम वार्ता मध्ये इकॅम करत असलेले कार्य, बातम्या छापायच्या असतील तर काहीतरी कार्य करायला हवे ना ! त्यामुळे ठरवूनच टाकले, किमान एक तरी कार्यक्रम प्रत्येक महिन्यात झाला पाहिजे. विद्युत साहित्य उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना सेमिनारची भीक मागणे मला फारसे आवडत आवडत नसे. त्यामुळे इकॅम वार्ता तुन मिळणाऱ्या पैशांचा विनियोग आम्ही वेगळ्या विषयावरील कार्यक्रम करून सभासदांचे प्रबोधन करायचे ठरवले. उदा. माहितीचा अधिकार (RTI), कामगार कायदा, विक्रीकर, सेवाकर, विद्युतकायदा, विद्युतसुरक्षा, विजेची बचत, महावितरण सा. बां. विभाग (विद्युत) यांच्या कार्यप्रणाली संबंधी कार्यशाळा, आपत्कालीन व्यवस्थापन, स्वीच गियर अँड प्रोटेक्शन चे चर्चा सत्र. वगैरे...
               इकॅम मधील भांडणे, राजकारण आणि निश्क्रियता यामुळे इकॅम  पासुन लांब गेलेले काही सभासद पुन्हा कार्यक्रमांना हजेरी लावु लागले. याचे बोलके उदाहरण म्हणजे विद्युत भारतीचे श्री. देशमुख हे आमचे सभासद म्हणायचे तुम्ही चांगले कार्यक्रम घेऊ लागलात म्हणुन मी इकॅम मधे येऊ लागलो. इकॅम पुणे विभागात घडणाऱ्या घटना मी सभासदांना S.M.S. द्वारे देण्याची पध्द्त सुरु केली. त्याचाही खुप फायदा होत असे. सभासदांना इकॅमच्या कामाची माहिती -मेल द्वारे, पोस्टाने, इकॅम वार्ता मधुन नियमीत मिळु लागली. इकॅम संस्था, त्याची माहिती वाटचाल या विषयीचा मी लिहिलेला लेख वर्तमान पत्रातुन छापुन आला. तसेच विजेच्या प्रश्नावरील लेख, विजेच्या बचती संबंधी सुरक्षे संबंधी माझे लेखही त्या काळात वर्तमान पत्रातुन प्रसिद्ध झाले. त्यामुळे इकॅम समाजाभिमुख झाली. महावितरणच्या सर्व कार्यालयात तसेच महाराष्ट्र एनर्जी डेव्हलमेंट एनर्जी ( meda ) वगै. सरकारी कार्यालयात इकॅम वार्ता पोहोचु लागला. काही नामवंत समाजसेवक, वर्तमानपत्राचे पत्रकार, संपादक यांनाही आम्ही इकॅम वार्ता पाठवत होतो.

    माझ्या अध्यक्ष पदाच्या काळातील इकॅम वार्ताचे काम मी खुप मनापासुन केलं. ते दिवस झपाटुन टाकल्यासारखे होते. मनात सारखे इकॅम वार्ता बद्दलचे विचार ठाण मांडून असत. इकॅम वार्ता उद्बोधक, मनोरंजक वाचनीय होण्यासाठी मी निरनिराळे प्रयोग करीत असे. एकदा रोटेरियन सुधिर राशिंगकर यांचे सुप्रसिद्ध उद्योजकांच्या वर आधारीत असलेले एक सुंदर पुस्तक माझ्या वाचनात आले. वॉरन बफेट, लक्ष्मणराव किर्लोस्कर, वालचंद हिराचंद अशा अनेक प्रेरणादायी उद्योजकांचे थोडक्यात चरित्र त्यांची यशस्वी वाटचाल या पुस्तकात आहे. माझ्या मनात आले की या यशस्वी उद्योजकांचे लेख इकॅम वार्तात जर छापुन आणले तर आम्हा विद्युत ठेकेदारांना त्यापासून नक्कीच प्रेरणा मिळेल. मी रोटरीमध्ये असल्याने सुधीर राशिंगकरांची यासाठी परवानगी घेणे मला सोपे गेले. तथापि राशिंगकाराच्या पुस्तकातील लेख किंवा उतारे जसेच्या तसे छापणे माझ्या स्वभावात नव्हते. ही चरित्रे आणखी आकर्षक करण्यासाठी ह्या उद्योजकांचे त्यांच्या काळातील जुने फोटो मिळवावेत ते या लेखाबरोबर छापावेत, म्हणजे लेख आकर्षक होतील असे माझ्या मनाने घेतले. मग आमच्याच इमारतीत राहणारे श्री. आर. आर. देशपांडे (किर्लोस्कर ऑइल इंजीन्स) या KOL. च्या संचालकांना भेटुन मी माझी इच्छा सांगीतली. त्यांनी किर्लोस्कर ब्रदर्स लि. ह्या कंपनीतील श्री. अविनाश पुरंदरे यांच्याकडे मला पाठवले. अनपेक्षीत पणे मला या सर्वांच्या कडुन सहकार्य मिळाले. या पुरंदऱ्यांनी मला लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या सुरवातीच्या काळातील खुप जुने म्हणजे जवळजवळ ८० ते ९० वर्षापर्वीचे फोटो दिले. जे फोटो खुप दुर्मिळ होते. १९०५ साली  लक्ष्मणराव किर्लोस्करांनी तयार केलेला पहिला लोखंडी नांगर, विहिरीवरील विजेवर चालणारा पंप बघणाऱ्या त्या काळातील नागरिकांचा फोटो, कडबा कापणी यंत्राचा फोटो असे जुने फोटो लेखामधे छापल्यामुळे लेख अतिशय आकर्षक झाला.

 शेठ वालचंद हिराचंद यांचे देखील जुने फोटो मिळवण्यासाठी मी खुप मेहनत घेतली. पुण्यातील कोथरूडमधील वालचंद इंडस्ट्रीज च्या ऑफिस मधुन मी बरेच जुने फोटो मिळवले. शेठ वालचंद  हिराचंद यांच्या बद्दल मला बरीच माहिती या निमित्ताने मिळाली. फिनोलेक्सचे सर्वेसर्वा श्री. पी. के. छाब्रिया यांचाही लेख सर्वासाठी प्रेरणादायी होता. या प्रेरणादायी उद्योजकांचे लेख 'यशोगाथा' या सदरा अंतर्गत आम्ही छापत होतो. मी एक चांगले काम करत असल्याचे मला समाधानही मिळत होते.
         
'यशोगाथा' या सदराबरोबर आणखीन काहीतरी नविन करावे असे वाटत होते. वीजक्षेत्रातील लेखनाबरोबरच मला आणखीन ही काही विषयावर लिहावेसे वाटु लागले होते. अध्यक्षीय लिखाणाबरोबरच इतर काही लिखाण करून मग 'इतरही थोडे बोलु काही' असे नाविन्यपूर्ण सदर सुरु केले या सदराची सुरवात अर्थातच सुप्रसिद्ध कवी श्री. संदीप खरे यांच्या मुलाखतीने केली. या साठी लिखाण मात्र मी करता माझा रोटरीतील मित्र 'रवी रांजेकरांच्या कडुन करून घेतले. तो माझ्यापेक्षा खुप छान लिहीतो. ही मुलाखत खुप आवडल्याचे अनेक वाचकांनी सांगितले.

 'मुलखा वेगळे भागवत आजोबा' आणि 'अंधश्रद्ध मी' हे थोडे वेगळ्या विषयावरील लेख मी या सदरात जेव्हा प्रसिद्ध केले तेव्हा नाशिक इकॅमचे श्री सुनील भुरे यांनी आवर्जुन लेख आवडल्याचे सांगितले. बऱ्याच वेळी विद्युत भारती या कंपनीचे श्री. देशमुख ही मला आवर्जुन फोन करून प्रोत्साहन देत. या इकॅमवार्ता मुळे माझी देखील थोडे फार लिहिण्याची इच्छा पुर्ण होऊ लागली होती.

इकॅम मुख्य कार्यालय - मोठे ओसाडगांव :

विद्युत ठेकेदारांच्या महाराष्ट्र राज्य पातळीवर असलेल्या इकॅम मुख्य कार्यालय मुंबईच्या फोर्ट विभागातील स्टॉक एक्चेंजच्या इमारतीत आहे. अंदाजे ४०० ते ४५० स्क्वे. फुटाचे हे कार्यालय इमारतीच्या तळघरातील एका कोपऱ्यात अत्यंत कोंदट अशा जागेत आहे. १९२५ साली स्थापन झालेल्या इकॅम ह्या संस्थेचे कार्यालय अशा छोट्याशा जागेत का आहे याचे मला नेहमी आश्चर्य वाटे. वास्तवीक इतक्या जुन्या संघटनेचे कार्यालयच काय पण कार्य देखील खुप मोठया प्रमाणात असायला हवे , तथापि मुख्य कार्यालयात देखील एकुणच शुकशुकाट होता. हे थोडे मोठे ओसाडगांव आहे एव्हडाच काय तो फरक! इकॅम च्या मुख्य संचालक मंडळातील संचालक अध्यक्ष सोडुन बाकी सर्व ओसाडगांवच! त्यात ही प्रत्यक्ष काम करणाऱ्यांची संख्या कमीच. या इकॅम नावाच्या मुख्य ओसाडगांवच्या कार्यालयात एक महिला दोन पुरुष कर्मचारी अनेक वर्षांपासून काम करतात.

 इकॅम पुणे विभागाप्रमाणेच मुंबईच्या मुख्य कार्यालयात मुख्य संचालकांची बैठक प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी संध्याकाळी ते अशी होत असे. पुणे विभागाचा प्रमुख या नात्याने मलाही ह्या बैठकीला हजर रहावे लागे. मुंबई मुख्य कार्यालयामधे होणाऱ्या ह्या मासिक बैठकीत पुणे, नगर, नाशिक या इकॅमच्या विभागीय अध्यक्षांना हजार रहावे लागे. या बैठकांना येणाऱ्या विभीगीय अध्यक्षांना मुंबईला येणे लांब पडत असल्याने एकुणच विभागीय अध्यक्षांची संख्या तशी कमीच असे. त्यातल्या त्यात पुणे मुबंई हे अंतर कमी असल्याने मला ह्या बैठकांना हजार रहाणे सोपे सोईस्कर होते. मी पुणे विभागाचा अध्यक्ष झाल्यावर जास्ती जास्त बैठकांना हजेरी लावायची असे ठरवुनच टाकले. पुण्यातील श्री. सुनील गायकवाड हे मुख्य संचालक मंडळात कार्यरत असल्याने मी श्री. गायकवाड हे दर महिन्याला मुंबईला एकत्र जाऊ लागलो. या मुंबईच्या बैठकांची वेळ संध्याकाळी ते अशी होती. बहुतेक  बैठका उशिरापर्यँत चालत त्यामुळे पुण्यात घरी यायला रात्रीचे १२ वाजत. नाशिक, धुळे येथुन येणारे संचालक तर बिचारे पहाटे घरी पोहोचत असणार. पण त्याला इलाज नव्हता. सकाळच्या मुंबईला जाणाऱ्या रेल्वेने मुंबईला गेल्यास १२/ वाजेपर्यंत व्हीटी ला आम्ही पोहोचत असु. पण तर हा वेळ कसा काढायाचा? किंवा रात्री पुण्याकडे येणाऱ्या रेल्वे गाडयांना तोबा गर्दी असायची, अशा अनेक अडचणी यायच्या, त्यामुळे मी ठरवले की, वाशी पर्यंत कारने जायचे पुढे वाशी ते व्हीटी लोकलने जायचे. येताना पुन्हा व्हीटी. ते वाशी लोकलने, मग वाशीत पार्क केलेल्या कारने पुण्यात परत. तथापि सुनील गायकवाड यांच्या बरोबर प्रवासात गप्पा, चर्चा व्हायच्या त्यामुळे मजा यायची.