मुलखावेगळे 'भागवत' आजोबा…
पाहता पाहता माझ्या वयाची
पन्नाशी उलटली. वृद्धत्वाची चाहूल
लागते आहे. शरीराने
थकलेले माझे आई
वडील त्यांच्या शेवटच्या
जवळ जवळ दहा
वर्षाच्या काळात माझ्याकडे राहत
असत. माझ्या
वडिलांचे वय सत्याऐंशी…
तर आईचे ब्याऐंशी…
आईवडिलांच्या वृधत्वातील अडचणी पाहून
मन विषण्ण होत
असे. जी जी म्हणून
शक्य होती ती ती
सेवा करून आम्ही
त्यांचे म्हातारपण सुखकर व्हावे
असा प्रयत्न करायचो.
त्यांची वृद्धावास्थेतली
अगतिकता बघून खूप
अस्वस्थ व्हायला व्हायचे. आई
च्या शेवटच्या वर्षात
स्मृतीभ्रंश झाल्यामुळे ती कोणालाही
ओळखत नसे.
शरीर खूप कृश
झाले होते. तिच्याकडे
बघावयाचे नाही. तिची सेवा
करताना गहिवरून यायचे. दादांना म्हणजे माझ्या
वडिलांना पार्किन्सन
झाला होता. त्यांना
चालायला यायचे नाही. म्हातारपणात
माणसाचे शरीर थकते.
शरीर अनेक व्याधींनी
ग्रस्त होते. वृद्धावस्थेत माणसाच्या
महत्वाकांक्षा संपून गेलेल्या असतात.
सर्व तरुण मंडळी
आपआपल्या कामात व्यग्र… कुणाला
बोलायला वेळ नाही.
आता आपले अस्तित्वच
संपणार तर मग
बेत तरी कसले
करायचे ? अशा मनस्थितीत
माणूस कसा जगात
असेल ?
परंतु अशाही परिस्थितीत,
अशाही वयात आपला
उपयोग दुसऱ्याला नक्की
होऊ शकतो अशी
धारणा असलेले व
खरेच दुसऱ्याच्या उपयोगी
पडणारे एक मुलाखावेगळे
ग्रेट 'भागवत आजोबा'त्याकाळी
आमच्याकडे नेहेमी येत असत.
या ग्रेट आजोबांचे
नाव ‘श्री
बाळकृष्ण अनंत भागवत’.
हे
मुलाखावेगळे भागात आजोबा माझ्या
वडिलांचे मित्र. वय अवघे
ब्याऐंशी वर्षे. शरीर थकलेले
पण मन तरुण,
कणखर, अतिशय उत्साही.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सच्चे
कार्यकर्ते. १९४८
साली रा.स्व.
संघावर जेंव्हा बंदी घालण्यात
आली होती, त्याकाळी
झालेल्या सत्याग्रहात त्यांनी तुरुंगवासही
पत्करला होता. १९५०
साली बडोद्याहून पदवी
घेऊन फलटण शुगर
वर्क्स मध्ये नोकरीस प्रारंभ
केला. नोकरी करता
करता ते शिकत
राहिले. पुढे वालचंदनगर
साखर कारखान्यात उच्च
पदावर काम करताना
महाराष्ट्रातील सात आठ
साखर कारखान्यांच्या उभारणीत महत्वाची
कामगिरी त्यांनी केली. सतत
संशोधनात्मक काम करण्यावर
त्यांचा भर असे.
आयुष्याच्या या प्रदीर्घ
कालखंडात त्यांनी संगीत प्रेम
ही जोपासले आहे..
ते बासरी, हार्मोनियम
आणि
जलतरंग उत्तम रीतीने वाजवतात.
असे हे भारी भागवत आजोबा आमच्या कडे दादांना भेटायला म्हणून जसा वेळ मिळेल तसे येत असत. आमच्या घरी आल्यावर दादांच्या समोर बसायचे आणि म्हणायचे " चला दादा तुमचे पाय पुढे करा…” आमचे दादा संकोचून 'नको नको' म्हणायचे, पण तरीदेखील ते दादांचे पाय स्वतःच्या पुढ्यात घेऊन प्रेमाने दाबत बसायचे. हे करताना दादांशी भरपूर गप्पा मारायचे. कधी कधी संघाची गाणी म्हणायचे. मग भागवत आजोबा त्यांच्या शबनम मधून बासरी काढायचे आणि बासरीच्या सुरांनी आम्हाला ते मंत्रमुग्ध करून टाकायचे. मग अलका दोघानाही चहा द्यायची. मग आगदी तास दीड तासाने ते म्हणायचे "चला निघतो, अजून बऱ्याच ठिकाणी जायचंय." मला नेहेमी उत्सुकता असायची कि या वयात एव्हडी कुठली कामे यांना असतात? मी त्याना एकदा विचारलेच "आजोबा आता कुठे निघालात ?" त्यांचे उत्तर ऐकून मी थक्क झालो. ते म्हणाले "आता पुढच्या आजोबांच्या कडे…" म्हणजे भागवत आजोबा स्वतःचे ८२ वर्षाचे वय असूनदेखील ज्या वयस्कर आजोबांना चालता येत नाही किंवा घराबाहेर पडता येत नाही अशा वृध्द लोकांकडे जाऊन त्यांची सेवा करीत , करमणूक करीत. ते मला म्हणाले " फार एकटे वाटते हो या वयात. कुणाला वेळ नसतो आमच्याशी बोलायला. मग माझ्या या वृद्ध मित्रांचा वेळ चांगला घालवताना माझाही वेळ छान जातो." माझ्या मनात विचार आला कि स्वतःच्या वयाकडे, अडचणींकडे दुर्लक्ष करून, दुसऱ्याच्या उपयोगी पडणारे भागवत आजोबा कुठे ? आणि आत्मकेंद्रित राहून फक्त पैशांच्या मागे पाळणारे आम्ही तरुण कुठे ?
तेंव्हापासून
मी आमच्या आई,
दादांसाठी मुद्दाम वेळ काढू
लागलो. दादांना एक व्हील
चेअर आणली. कधी कधी
आई, दादांना कार
मधून दूरवर फिरायला
घेऊन जाऊ लागलो.
दोघांशी आवर्जून गप्पा मारू
लागलो. एव्हडेच
काय पण माझ्या
ओळखीच्या इतरही आजी आजोबांच्या
कडे ही मुद्दाम
गप्पा मारायला जाऊ
लागलो. प्रत्येक दिवाळीला ओळखीच्या
आजी आजोबांना भेटून,
त्यांच्या पाया पाडून
दिवाळी च्या शुभेच्छा
देऊ लागलो.
भागवत आजोबांच्या कडे
बघून माझ्या मनात
नेहेमी विचार येत असत
कि तरुण असताना
किंवा एकूणच आपण
गरज नसलेल्या गोष्टी
करत असतो, आणि
वृद्धांसाठी मात्र आपल्याला वेळ
नसतो. आता हेच
बघाना अनावश्यक असलेल्या
रूढी, परंपरा आपण
वेळ काढून पाळतो.
केवळ जायला पाहिजे
म्हणून आपण अनेक
लग्न समारंभाला, किंवा
रिसेप्शनला आवर्जून, वेळ काढून
जातो. खरे
तर सातशे आठशे
लोकांच्या गर्दीत तुम्ही गेलात
काय किंवा न
गेलात काय… काय
फरक पडतो. लग्नाला
जाण्यास माझा विरोध
नाही, पण वृद्धांना
वेळ देण्याच्या जबाबदारीचे
काय? लग्न समारंभाच्या
गर्दीचा अतिरेक टाळून वृद्धाश्रमातल्या
एकाकी वयोवृद्ध आजी
आजोबांना भेटण्यासाठी आम्ही वेळ
काढू का शकतो
काय ? इथे भागवत
आजोबांसारख्या व्यक्तींचे मुलाखावेगळेपण अधिक
अधोरेखित होते.
ओळखीची व्यक्ती मरण पावल्यावर
आपण वेळ काढून
अंत्यविधीसाठी स्मशानात जातो. सगळ्यांनी
जाणे खरच आवश्यक
असते काय? (जाताना
जो तो शक्य
तो भरल्या पोटीच
जातो. म्हणजे उशीर
लागला तर हरकत
नाही, असा सोयीस्कर
विचार.) मग स्मशानात
विधी चालू असताना
ग्रुप्स पडतात, गप्पांना उधाण
येते. आगदी हास्य
विनोदही होतात. कारण बरेचसे
लोक शिष्टाचार किंवा
पद्धत म्हणूनच आलेले
असतात. मरण पावलेल्या
व्यक्तीच्या कुटुंबियांना मानसिक आधाराची गरज
नक्कीच असते. परंतु ती
गरज आगदी जवळच्या
नातेवाइकांनी ती पूर्ण
करायची असते; किंबहुना असे
जवळचे नातेवाइकच तो
मानसिक आधार देत
असतात. केवळ पद्धत
म्हणून आलेली माणसे मृत
व्यक्तीच्या नातेवाईकांना कदाचित नकोशीच वाटत
असतात. आजारी किंवा वृद्ध
व्यक्तीला मृत झाल्यावर
स्मशानात जाउन गर्दी
करण्यापेक्षा जिवंतपणी आधार देणे
योग्य नव्हे काय ?
विचार करा… किमान
विचार करायला काय
हरकत आहे? पटले
तर हे काम
नक्की करा… वृद्धांसाठी
वेळ काढा.
राजीव जतकर.
मोबाईल : ९८२२० ३३९७४.